आज माझ्या एका मैत्रिणीला ब्लॉग कसा असतो आणि लिहायचं कसं हे सांगत असताना सहज माझ्या जुन्या पोस्ट बघितल्या आणि लक्षात आलं की कितीतरी दिवसात मी पोस्ट केली नाही. याचा अर्थ लिहण्यासारखे आणि सांगण्यासारखे काहीच नव्हते असे नाही.पण लिहिले नाही. आज परत टाईप करताना मन उगाच हलके झाले आहे. हे आपण प्रकाशित करण्यासाठी लिहित आहोत की नाही याचा विचार अजिबात मनात आला नाही.हे एकप्रकारे बरे झाले.
अनेक दिवसांपासून मन वेगवेगळ्या.विषयांचा ध्यास घेत आहे.पण म्हणतात ना एक ना धड. भाराभर चिंध्या.तसे काहीसे कडे आहे.प्रत्येक गोष्टी विषयी कुतूहल वाटत राहते. आणि जगण्याला मजा येते.ही मजाच तर आपल्याला सतत उत्साही आणि आनंदी ठेवत असते. So आपला आनंद कशात आहे तो शोधू या. Happy day.
No comments:
Post a Comment