Tuesday, November 25, 2014

वाट पहाणे


    वाट पहाणे आणि च्या साठी वाट  पहाणे यामध्ये सूक्ष्म फरक आहे,जसा शांततापूर्ण प्रगती आणि तणावपूर्ण यश यात जसा फरक आहे.
    शेतकरी नांगरणी करतो आणि बीज पेरतो  ...नंतर त्याला थांबावं लागतं..तिथे त्याची पेरण्याची  जबाबदारी संपते. आता जर त्याला  वाट पहाण्याची कला माहित असेल  तर तो शांततेने वाट बघेल.त्याऐवजी जर तो” आता  मोड कधी येतील काय माहित? या विचाराने  वाट पहात  राहील तर तो अस्वस्थ होईल आणि त्याच्यावर ताण येईल. त्याचे मन सतत म्हणत राहील –“असे का घडले नाही?अजून का घडले नाही.अखेरीस मोड आलेच तरी त्याने त्याची शांतता त्या यशासाठी खर्च केलेली असते. बिघाड होवून गेलेला असतो.
       जर आपण  लिफ्टचे बटण दाबले तर आपल्याला ती येण्याची  वाट पहावी लागेल. आपण शांत राहू .पण ”ची वाट पहाणे” आपल्याला जमिनीवर ठेवेल पण आपले  डोळे सारखे  वर आणि खाली करतील ,आपण पन्नास वेळा त्याची बटण दाबत राहू,बरोबरच्या व्यक्तीला आपली कृती कशी बरोबर आहे हे पटवत राहू,मागच्या वेळी असं केल्याने लिप्ट कशी पटकन आली हे ही जोडीला सांगत राहू ...आपल्याला  वाटेल जर तिचा वेग वाढवता आला  तर ती आपल्यापर्यंत  लवकर येईल.तसेच आपण वेटरला ऑर्डर दिल्यांनतर आपल्याला काही वेळ  थांबावं लागते.हे आपल्यालातल्या काही जणांना माहित नसते. त्यांना वाटते की वेटरने  ते हॉटेलात शिरल्या बरोबर त्यांचे मन वाचावे  आणि पटकन त्यांना हवे ते आणून द्यावे . ..वेटर “ची वाट बघणे” याचा त्यांना संतापजनक अनुभव येतो
  .आपल्याला हवा तसा निर्णय आपण घेतो  ....आपल्याला  जशी कृती करायची तशी करत आहोत .तर मग ..आता थांबा...त्या “च्या वाट पहाणे” यासाठी नाही तर फक्त थांबा....यात आपल्याला  शांततेची किल्ली सापडेल,”ची वाट पहाणे” सुद्धा आपल्याला  यश देईल,पण ते यश  तणाव सुद्धा देईल.जर  यशासाठी शांततेचा मार्ग आहे तर मग तणावाचा मार्ग कशाला घ्यायचा? नाही का?
     अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी एक आवश्यक गुण लागतो आणि तो म्हणजे आपली भूमिका करायची आणि थांबण्याची क्षमता होय.अनेक लोक अध्यात्मिक अनुभवासाठी  लोक रडत असतात,त्यांच्या हातून शांतता निसटून जाते,आणि खरं तर ते त्यांच्या “ची वाट पहाणे” या  दृष्टिकोनामुळे दुःखी असतात. “ची वाट पहाणे” मुळे अनुभवा ऐवजी  आपण आपल्या  विरूद्धच उभे राहतो , खर तर आपल्याला  “ज्या  अनुभवाचा”साक्षीदार व्हायचे असते.तो  अनुभव हा नुसता  थांबण्याचा साक्षीदार आहे.

  “ची वाट पहाणे “ सोडून देवू या  म्हणजे आपण  तणावपूर्ण  यशही आपोआप येणार नाही. आपले  काम/भूमिका आणि आपली कार हे सर्व  थांबा आणि हे शिकून घ्या या मंत्राने केले तर आपल्या प्रगतीचा मार्ग हा शांततेचा असेल. अर्थात हे सर्वच मला एका काकडीच्या बी ने शिकवलं.

No comments:

Post a Comment