Sunday, October 9, 2011
मागे पडत जाणारी माणसं किंवा ज्यांना वेगाच्या,गतीच्या बरोबर धावता येत नाही अशी माणसं किंवा ज्यांना बदल स्वीकारता येत नाही,त्या बदलत आपलं स्थान कोणतं याचा हिशोब लागत नाही अशी माणसं अस्मिता अस्मिता म्हणून ओरडतात. असे कधी कधी वाटते.कोणी काही नवीन केले,किंवा एखादा जुना विषय,इतिहास कालीन व्यक्ती किंवा ताजा विषय पण नवीन दृष्टीने पहिला तर या माणसांना ते स्वीकारणे अवघड जाते. त्यांना एका स्थिर जगात राहयचे आहे असे वाटते. शिवाय त्यांचे अस्तित्वच मुळी त्या बदलांना विरोध करण्यापुरते दिसते. इतरवेळी ही माणसं काय करतात.घरकाम करतात का? बाहेर कुठे नोकरी करीत नसावीत.शिकली सवरली असली तरी फार जाणीवपूर्वक झालेलं नसावं नाहीतर बदलांना अशा पद्धतीने सामोरी गेली नसती.
Labels:
मनगुज
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment