वाचावं जनाचं लिहावं मनाचं
तो असतांना,तो नसतांना -
वाचावं जनाचं लिहावं मनाचं
तो असतांना,तो नसतांना -
वाचावं जनाचं लिहावं मनाचं
"दोला " हे गायत्री पगडी यांचं पुस्तक वाचून दोन चार वर्षे झाली असतील.काल परत ते समोर दिसलं आणि मी समोर येईल त्या पानापासून वाचायला सुरुवात केली.अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी परत परत कशाला वाचायला हव्यात?असं काहीजण मला म्हणत असतात.पण गायत्री ज्या धीराने आपल्या स्वतःच्या आणि नवऱ्याच्या आजाराकडे बघतात आणि त्यातून मार्ग काढतात. ते वाचणं,तो त्याच्याबरोबरचा प्रवास मला खूप काही देवून जातो.शिकवून जातो. ते पुस्तक आपलं कधी होवून जातं तेही कळत नाही.
#वाचावं जनाचं लिहावं मनाचं
"Our Bodies,ourselves"
#वाचावंजनाचंलिहावं मनाचं
( या सदराखाली मी फेसबुकवर लेख लिहले होते.ते पुनः इथे देत आहे.)
समतानंद’ अनंत हरी गद्रे –भानू काळे
#वारी
हरीपाठाची वेळ झाली.आम्ही आमची बसकरे घेऊन बसलो. टाळ वाजायला लागले.जणू हे वातावरण मी परत परत अनुभवले आहे , कितीतरी वर्षांपासून यांच्या बरोबरच आहे असं मला वाटत होतं. मला मनातल्या मनात आनंद होत होता.हरिपाठ झाल्यावर लांडगे महाराज यांचे प्रवचन झाले. आपण त्यांच्याकडे बघितले तर ते खूप साधे दिसत होते.पण ज्ञानेश्वर, तुकाराम त्यांच्या जिभेवर खेळत होते. तरी ते म्हणाले की ,’ पाहुनिया ग्रंथ ,करावे कीर्तन ‘ म्हणजे अभ्यास केल्याशिवाय कीर्तन करू नये. कारण ती देवाची सेवा आहे. त्यांनी संताचे महत्व सांगितले. संतांनी आलिंगन दिले तर सायुज्य मोक्ष प्राप्त होतो. त्यांनी सांगितले की इच्छा तीन प्रकारच्या असतात. जन्म त्या नुसार होतात. दुसऱ्याच्या इच्छेने येतात ते देव.देवाचे स्वरूप निर्गुण निराकार आहे. त्याला प्राप्त करायचे असेल तर संतांकडे जावे लागेल. संत स्वइच्छेने जन्म घेतात.भगवंताचे महत्व वाढविण्यासाठी त्यांचा जन्म असतो. आपण मात्र अनिच्छेने जन्म घेतो.अनिच्छेत दुःख असते.पण जन्मभराची प्रसन्नता हवी असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. नामावर भरवसा असला पाहिजे.म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला. खरं तर त्यावरच त्यांचे प्रवचन होते. “ ऐसा संतांचा महिमा , झाली बोलायची सीमा .............तुका म्हणे देवा , त्यांची केली पावे सेवा.
#वारी
धर्मपुरीच्या मुक्कामात अनेक गंमतीजंमती करत आम्ही नातेपुत्याला निघालो. मला उगीचच वाटत असेल की आता सगळ्यांचे पाय अधिरतेने पंढरपूर कडे धावत आहेत. सतत कोणाचे काय चालले आहे किंवा इथे काय जे चालू असते ते आपल्याला नीट समजायला हवे या विचारानेही मला अधिरता जाणवत असावी. खरंतर दिवसाच्या कोणत्याही प्रहरी भजन आणि टाळ मृदुंगाचा आवाज कानावर पडत असे.त्यामुळे सतत आपण जागे आहोत ही भावना मनात घर करून राहिली होती. हे जागेपण दोन्ही प्रकारे असेल अशी समजून करून घ्यायला हरकत नाही.पण ते स्वतःच तपासून बघणे अवघडच आहे.
#वारी
संध्याकाळी प्रवचन होते. त्यांनी संपूर्ण वारीत या ओवीवर प्रवचन दिले. तुम्ही वारीतून ही ओवी घेवून जाल . ती ओवी पाठ होईल असा त्यांचा विश्वास होता आणि तो खरा ठरला .ज्ञानेश्वरीमधिल १५ व्या अध्यायातील ३०० वी ओवी वर त्यांनी प्रवचन दिले. ते म्हणायचे सेवा रुजू करतो.