कवी म्हणाला होता की आपण गेल्यावर पुस्तकांचे काय होणार? कोण त्यांच्यावरून हात फिरवणार? त्यांच्याशी मायने कोण वागणार? गेल्यावर पुस्तकांचे काय होणार हे माहीत नाही.कारण माझ्याच घरातून माझी इच्छा नसताना माझी कितीतरी पुस्तके केवळ घरात पसारा दिसतो म्हणून जात आहेत.ती योग्य ठिकाणी पोहचली वगैरे याचे मला कधीच समाधान वाटत नाही.माझी पुस्तके मला माझ्याच जवळ हवी असतात. हल्ली माझी विरोध करण्याची क्षमता संपली आहे.दरवेळी तो वाद,रडारड नको वाटते.कारण मला पुस्तके का हवी आहेत तेच कोणाला समजत नाही. पुस्तके घरातून जाण्याचा प्रसंग अजून अनेक वेळा माझ्यावर येणार आहे,तरीही मी पुस्तके आणण्याचे थांबवणार नाही. ती येत राहणार.
No comments:
Post a Comment